Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
वीस कलमी कार्यक्रम
टिप्पणी लिखिए
उत्तर
1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे:
- शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे.
- कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे.
- करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे.
- जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे.
- हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.
shaalaa.com
वीस कलमी कार्यक्रम
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]