हिंदी

या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

टिप्पणी लिखिए

उत्तर

सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नांदेल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात, अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.

shaalaa.com
सर्व विश्वचि व्हावे सुखी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी - कृती [पृष्ठ ८५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी
कृती | Q (६) (इ) | पृष्ठ ८५

संबंधित प्रश्न

खालील चौकट पूर्ण करा.

संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत - ______ 


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


फरक सांगा.

सामान्य माणसाचे मागणे  संतांचे मागणे
(अ) (अ)
(आ) (आ)

खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.

जे खळांची व्यंकटी सांडो - ______ 


खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.

दुरिताचें तिमिर जावो - ______  


खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा. 

(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य) 

अ. क्र. काव्यांश संतांचे नाव काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना
(१) ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ ______ ______
(२) ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’ ______ ______
(३) ‘सर्वांभूती भगवद्भावो’ ______ ______
(४) ‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’ ______ ______
(५) ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ ______ ______

सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.


‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील आकृती पूर्ण करा. (२)

जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
i. संतांच्या साहित्याचा आत्मा महाराष्ट्र
ii. संतांची भूमी विश्वकल्याण
iii. सर्व संतांच्या मागणीतील एकमेव गोष्ट मानवता
iv. सर्व संतांच्या प्रार्थनेतील आविष्कार भक्ती व समाजप्रबोधन, समाजकल्याण
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें।' ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वत:साठी काहीही मागत नाहीत; परंतु 'बुडतां हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणउनि।।' यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरुनानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे, कारण 'मी' पासून 'आम्ही' या संकल्पनेप्रमाणे 'अवघे विश्वचि माझे घर', 'वसुधैव कुटुम्बकम्' या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा 'विश्वकल्याण' याचा परिचय या पाठातून करून घेऊया.

2. एका वाक्यात उत्तर लिहा. (२)

  1. विश्वकल्याण कधी शक्य आहे?
  2. संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या संकल्पना सांगा.

3. स्वमत. (३)

'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें' या चरणाचा अर्थ उदाहरणांसह स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. एका शब्दात उत्तर लिहा. (२)

  1. मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना म्हणजे. 
  2. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ग्रंथ.
संत ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते; परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ’’आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा“, यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, ’’मी देवापाशी आधी मागितले आहे. ते, म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.“ संत निवृत्तीनाथ म्हणाले, ’’ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा.“ यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत, 'आपणही गुण्यागोविंदाने राहावे', हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले.

2. कोष्टक पूर्ण करा. (२)

3. स्वमत. (३) 

निसर्गातील सर्व घटकाप्रमाणे माणसाने पण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×