Advertisements
Advertisements
प्रश्न
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा...
उत्तर
माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा तो दुःखाला स्वत:च्या मनाबाहेर जाऊ देत नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमत
कृती करा.
लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे
कृती करा.
माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार
यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.
पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा...
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंदाला आकर्षित करणारा - ______
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंदाला प्रसवणारा- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंद अनुभवण्याची निमित्तं- ______ ______
स्वमत.
‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
स्वमत.
‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हांला हलकंहलकं, पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपणं नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवेत. काहींना एखादं बक्षीस मिळालं, तरी त्या ‘अमक्या’ला चार बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं किंवा मग ‘त्या लेकाला एकही बक्षीस मिळालं नाही’, याचाच अधिक आनंद होतो. स्वत:ला काही मिळणं, स्वत: आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं, ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. तुलना आली, की आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दु:खावर कधीच पोसला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे, तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो, तेव्हा त्याला सगळं जग छान, सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत, आनंदात असावं, असंच त्याच्या मनात येत असतं. स्वत:च्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा, असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं, की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो, माणसं दु:खातून बाहेर येत नाहीत. त्याचं कारण ते दु:खाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील, तर आतलं दु:ख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दु:ख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल, तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्यादिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी ‘कधी पडायचा पाऊस’ म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाइलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे ... नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल, म्हणून वाट पाहत बसलं, तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो. कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं, की मग मात्र ‘नाही आनंदा तोटा’ अशी अवस्था होते. |
(१)
(i) (1)
(ii) (1)
आभाळाकडे डोळे लावून बघतो तो
एकदा आनंद कसा घ्यायचा ते तंत्र जमलं कि
खरा आनंद ओळखण्याची एक
(२) खऱ्या आनंदामुळे कोणकोणत्या गोष्टी घडतात? (2)
(३) स्वमत अभिव्यक्ति (4)
‘खरा आनंद दुसऱ्याच्या दु:खावर कधीच पोसला जात नसतो’ या विधानाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा.
किंवा
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’ या विधानाचा तुमच्या जीवनात कसा उपयोग कराल? उदाहरणासह लिहा.