English

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १) कोष्टक पूर्ण करा. कोणतेही कार्य करताना घ्यावयाची काळजी - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) कोष्टक पूर्ण करा.  (२)

श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण।
जेणें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची।।१।।

वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये।
पडिली वस्तु घेंऊ नये। येकायेकीं।।२।।

जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।३।।

तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।।४।।

आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
शोधिल्याविण करूं नये। कार्य कांही।।५।।

सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
पैज होड घालूं नये। कांहीं केल्या।।६।।

कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये।
परपीडा करूं नये। विश्वासघात।।७।।

व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये।
आपलें वोझें घालूं नये। कोणीयेकासी।।८।।

सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।।९।।

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।।१०।।

२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.  (२)

क्र. गोष्टी उत्तर दक्षता
i. आळस ______ मानू नये.
ii. परपीडा ______ वागू नये.
iii. सत्यमार्ग ______ नये.
iv. सभेतील वर्तन ______ नये.

३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।

४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.  (२)

तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।

Answer in Brief

Solution

१)

२)

क्र. गोष्टी उत्तर दक्षता
i. आळस सुख मानू नये.
ii. परपीडा विश्वासघातकी वागू नये.
iii. सत्यमार्ग सोडू नये.
iv. सभेतील वर्तन लाजू नये.

३) सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, असत्याच्या वाटेवर कधीही जाऊ नये व खोटेपणाचा अभिमानही कधी बाळगू नये.

४) 'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगतिली आहेत. तिने कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा खुलासा केला आहे.
भांडखोर व्यक्तीशी भांडायला जाऊ नये. सतत बडबड करणाऱ्या व्यक्तीशी वाद घालत बसू नये, कारण या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती समोरच्याचे बोलणे ऐकून न घेता स्वत:चेच म्हणणे खरे करणाऱ्यांपैकी असतात. त्यांच्याशी बोलणे म्हणजे आपला वेळ, आपली शक्ती वाया घालवल्यासारखे होईल. त्यामुळे, अशांचा संगच टाळावा; परंतु संतांच्या संगतीत अखंड रमावे. मनापासून त्यांच्या सहवासाचा, सान्निध्याचा लाभ घ्यावा, कारण त्यांच्या संगतीत राहून आपणही सज्जन बनतो, असा संदेश वरील काव्यपंक्तींतून कवी व्यक्त करतात.

shaalaa.com
उत्तमलक्षण
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: उत्तमलक्षण - कृती क्रमांक १

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 4 उत्तमलक्षण
कृती क्रमांक १ | Q 2. (अ)

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.

तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.


खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

तोंडाळ


खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

संत


खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.

गोष्टी दक्षता
(१) आळस ______
(२) परपीडा ______
(३) सत्यमार्ग ______

खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.

‘जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
 पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।’


‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

उत्तमलक्षण

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

उत्तमलक्षण

  1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा.  (१)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश.  (१)
  3. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×