SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)
Academic Year: 2022-2023
Date & Time: 19th July 2023, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना:
- सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
- आकृत्या पेननेच काढाव्यात.
- उपयोजित लेखनातील प्रश्नांसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
- विभाग ५ - उपयोजित लेखन प्र. ५ (अ - २) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र. १ (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखनानियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
(अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) कारणे लिहा: [२]
- रेखामावशींची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत; कारण......
- स्नेहलने कॉलेजला जाताना सायकल वापरण्याचा निर्णय घेतला; कारण......
“काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत '', सुमित बोलत होता. “बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करीत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत”, स्नेहल गहिवरून म्हणाली. अभिषेक भारावून म्हणाला, “माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!" “खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर॒ आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट”, अभिषेकचे बाबा म्हणाले. |
(२) उत्तरे लिहा: [२]
- अभिषेकने केलेला निश्चय .........
- पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची आवश्यकता .........
(३) स्वमत:
'तापानं फणफणलीय आपली धरती ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. [३]
Chapter:
उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
(१) कृती करा: [२]
कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही वाघिणीची पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽव' असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अद्याप भान नव्हतं. |
(२) आकृती पूर्ण करा: [२]
(३) 'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली,' हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा. [३]
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:
(१) कोण ते लिहा: [२]
- ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देणारे -
- अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे असे सांगणारे -
शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची श्रद्धा आहे. शिक्षण हा एकूणच मानवी जीवनाचा पायाभूत संस्कार आहे आणि शाळा हे संस्कारकेंद्र आहे. थोर समाजचिंतकांनी 'विद्ये'ला, 'ज्ञाना'ला महत्त्व का दिले याचे इंगित हेच आहे. विद्या जीवनाला वळण देते, सुधारते. विद्येची वाढ होणे सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्याचे लोकहितवादींनी प्रतिपादिले होते. नव्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी प्राचीन व्यवस्थेची चिकित्सा करणे त्यांना आवश्यक वाटत होते. गोपाळ गणेश आगरकर नव्या ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देत होते, तर महात्मा जोतीराव फुले यांनी 'विद्येविना मती गेली' असे विद्येचे महत्त्व प्रतिपादून 'अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे' असे सांगितले. |
(२) विधाने पूर्ण करा: [२]
- शाळा हे --------
- 'विद्येविना --------'
Chapter:
कवितेच्या आधारे सूचनांनुयार कृती करा: [8]
(१) चौकटी पूर्ण करा:
- क्षणिक सुख देणारे - ______
- चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______
- व्यक्तीला सदैव सुख देणारा - ______
- चिरकाल टिकणारा आनंद - ______
जैवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलीयांसी। जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।। जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ। उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।। उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती। योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।। उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां। योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।। मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण। अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।। तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें। जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।। |
(२) आकृती पूर्ण करा:
(३) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा:
- तृषित = ------
- मृदुत्व = ------
- रसना = ------
- निवविणे = ------
(४) 'योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे ' हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Chapter:
पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता: 'दोन दिवस'
मुद्दे | दोन दिवस |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. |
(iv) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | |
(v) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
Chapter:
पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता: 'हिरवंगार झाडासारखं'
मुद्दे | हिरवंगार झाडासारखं |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. |
(iv) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | |
(v) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
Chapter:
तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
Chapter: [0.08199999999999999] जाता अस्ताला (स्थूलवाचन)
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.
Chapter: [0.042] मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)
Advertisements
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा:
माझ्या वडिलांची बदली परत पुण्यास झाली.
Chapter:
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा:
तुम्ही आतापर्यंत किती झाडं लावली?
Chapter:
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
साहित्याचे रंग खूप आहेत. (उद्गारार्थी करा.)
Chapter:
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
रेखामावशींचे पाय स्वच्छ आहेत. (नकारार्थी करा.)
Chapter:
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ,सांगून वाक्यात उपयोग करा:
भान ठेवणे.
Chapter:
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
पारंगत असणे.
Chapter:
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
झोकून देणे.
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा:
वार्याचा वेगवान प्रवाह - ------
Chapter:
Advertisements
खालील शब्दाचे लिंग बदला.
कवी - ------
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
पुढील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
अब्दूलने एकवार तीच्याकडे बघितले.
Chapter:
पुढील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
वाळवंटी प्रदेशाते वर्षातुन एखादाच पाउस पडतो.
Chapter:
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
‘....’ -
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
; - ______
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची श्रद्धा आहे. शिक्षण हा एकूणच मानवी जीवनाचा पायाभूत संस्कार आहे आणि शाळा हे संस्कारकेंद्र आहे. थोर समाजचिंतकांनी 'विद्ये'ला, 'ज्ञाना'ला महत्त्व का दिले याचे इंगित हेच आहे. विद्या जीवनाला वळण देते, सुधारते. विद्येची वाढ होणे सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्याचे लोकहितवादींनी प्रतिपादिले होते. नव्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी प्राचीन व्यवस्थेची चिकित्सा करणे त्यांना आवश्यक वाटत होते. गोपाळ गणेश आगरकर नव्या ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देत होते, तर महात्मा जोतीराव फुले यांनी 'विद्येविना मती गेली' असे विद्येचे महत्त्व प्रतिपादून 'अविद्या हे सर्व अनर्थांचे मूळ आहे' असे सांगितले. |
वरील अपठित उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
संगणकं प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार कराः
Chapter: [0.17] उपयोजित लेखन
नवजीवन विद्यालय, भंडारा या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
Chapter:
अपूर्ण कथा पूर्ण करा:
आज राहुल अतिशय आनंदात होता; कारण त्यांच्या शाळेची सहल पालगड येथे जाणार होती. लवकरच तो शाळेत पोहोचला त्याचे सर्वच मित्र तयारीनिशी आले होते. सहल सुरू झाली. गाडीत सर्वांची मस्ती चाललेली होती. घाटातून गाडी चालली होती. निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद सर्व मुले घेत होती. घाटात गाडी एका वळणावर थांबली आणि ..........
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] with solutions 2022 - 2023
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam -2023 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam.
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.