Advertisements
Advertisements
प्रश्न
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील प्रस्तुत काव्यपंक्तींद्वारे कवी वसंत बापट यांना कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते अधोरेखित करायचे आहे.
आपापसांतील माणुसकीचे नाते अखंड टिकून असल्यामुळे कष्टकरी वर्गात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही. 'श्रम' करणे हेच त्यांचे इमान आहे. कष्टावरच त्यांची निष्ठा आहे. कष्ट हीच त्यांची ओळख, कष्ट हाच धर्म आहे. कष्ट करून आपले पोट भरणे हाच त्यांचा मार्ग आहे. कष्टातून मिळणारा आनंद हेच त्यांच्यासाठी स्वर्गसुख आहे. त्यामुळे, कष्टाशिवाय त्यांना वेगळा असा दुसरा धर्म, पंथ, जात, मार्ग नाही. या कष्टांच्या बळावरच ते स्वत:चे भाग्य लिहू शकतात, असा दुर्दम्य आत्मविश्वास कवी प्रस्तुत ओळींतून व्यक्त करत आहे.
संबंधित प्रश्न
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
सुंदर जग → | कोणाचे | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
(अ) आकाश-
(आ) सुगंध-
(इ) सुंदर-
(ई) शरीर-
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.