मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.

लेखन कौशल्य

उत्तर

साहिल बोरकर, 
३०२, साई धाम,
दादर (प).
मुंबई- ४०० ०२५
दि. १० जून २०१८

प्रिय सुहास,
सप्रेम नमस्कार,

कसा आहेस तू? काका-काकू कसे आहेत? तू नाशिकला गेल्यापासून एकदाही आपण भेटलो नाही. आम्ही मित्रांनी मिळून गेल्या आठवड्यात आपल्या परिसरात 'स्वच्छता अभियान सप्ताह' साजरा केला. आठवडाभर आम्ही सर्वांनी फुटपाथवर उभे राहून रस्त्यावर कुठेही थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या लोकांना चांगल्या शब्दांत समज दिली. त्यातील अनेक लोकांनी आम्हांला पुन्हा असे न करण्याचे वचनही दिले आहे. तसेच, आम्ही आपल्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी जमेल तशी साफसफाई केली. आपल्या राजूदादाने बसवलेल्या 'अस्वच्छता निर्मूलन' नावाच्या पथनाट्यातही आम्ही सहभागी झालो होतो. ते पथनाट्य लोकांना खूप आवडले. शिवाय, लोकांमध्ये चांगली समज निर्माण झाली, बदल घडून आला. या सर्व उपक्रमांसाठी आपले स्थानिक नगरसेवक राजन सोनावणे यांनी त्यांचे स्वयंसेवक देऊन साहाय्य केले.

तुला सांगतो, असेच उपक्रम जर प्रत्येक गल्ली, रस्ते, गाव, शहरात राबवले गेले, तर लवकरच आपल्या देशाचा चेहरामोहराच बदलून जाईल. पुढच्या महिन्यातही आम्ही मुले असाच उपक्रम पुन्हा करणार आहोत. आम्ही राबवलेला हा उपक्रम तुला कसा वाटला ते नक्की कळव. तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. काका-काकूंना माझा नमस्कार कळव.

तुझा मित्र,
साहिल

shaalaa.com
लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: पाणपोई - विचार करून सांगा! [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 17 पाणपोई
विचार करून सांगा! | Q ६. | पृष्ठ ५३
बालभारती Integrated 6 Standard Part 4 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.5 आपण हे करूया !
विचार करून सांगा! | Q ६. | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्‍न

खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.

आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते.

मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


              फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?

         फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात.

         कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.


‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

__________________

__________________

__________________


खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.

एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________


अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.


महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.


सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?


तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×