Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
उत्तर
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे.
कष्टकरी ही निसर्गाची लेकरे आहेत. कष्ट करणे हाच त्यांचा धर्म आहे. परिश्रम केल्यावरच फळ मिळते; परंतु हे कष्ट, परिश्रम चिकाटीने व श्रद्धेने सतत करावे लागतात. कष्टकरी या कष्टांवर विश्वास ठेवतात. श्रद्धेने घाम गाळून काम करतात. त्यांचे इमान, त्यांची निष्ठा कष्टांनाच वाहिलेली असते. कष्ट करणे हेच त्यांचे ध्येय असते. घाम येईपर्यंत अखंड, अविरत कष्ट करत राहणे, हे कष्टाचे व्रत कष्टकरी श्रद्धेने पाळतात, हे प्रस्तुत ओळींतून कवीला सांगायचे आहे.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
अमूल्य शिकवण → | कोणाची | ______ |
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
मनोहर -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.