Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझे आवडते शिक्षक
उत्तर
माझे आवडते शिक्षक
आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन, मला माझे आवडते शिक्षक आठवयाला लागले तर सरळ शालेय जीवनातील शिक्षकच असणार, माझ्या शालेय जीवनात प्रत्येक शिक्षकाचे आचार, विचार, रंग, ढंग आणि स्वभाव वेगळा होते. काहींबरोबर सूर जुळतात, काहींना खास टोपणनावं ठेवली जातात काहींबरोबर खास आकर्षणांमुळे आठवणी रुजलेल्या असतात, काही फक्त खास सवयीमुळे ओळखले जातात. जसे काळाच पेन वापरायचं, प्रत्येक उत्ताला चौकट, ‘ऐ मुर्खा काययेतं तुला ..... !’, ‘सगळं बरोबर! अशा सगळ्या वळणावळणांनी शालेय जीवनाचा प्रवास सुरू राहतो. तरी एखादे असे शिक्षक असतात जे व्यक्तिमत्वाने प्रभाव सोडतात आणि ते प्रत्येकापेक्षा अतिशय वेगळे असतात! असे हे माझे आवडते शिक्षकांचे नाव श्री. तुकाराम रामजी पाटील आहे. आम्ही प्रेमाने ‘पाटील सर’ म्हणायचो, गणित विषयात तज्ज्ञ, त्यांची गव्हाळ रंगांची, उंच, भव्य, रुबाबदार आणि सुदृढ़ मूर्ती दृष्टीला पडताच नकळतच माझे हात जोडले जातात. माझ्या आयुष्यात त्यांच खास स्थान आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवले तर घरी यायचे आणि माझ्या आई-वडिलांना माझे कौतुक सांगायचे.
पाटील सर! स्वभावाने अत्यंत प्रेमळ, सतत मदतीला तयार, दयाळू स्वभाव, कर्तव्यनिष्ठता आणि साधी राहणी हे यांचे अद्वितीय मिश्रण होते. एकच असे सर होते ज्यांना टोपणनावें जरी पडली असली तरी एकदाही त्यांची थपण झाली नाही. विद्यार्थांना नेहमी मदत करण्याची वृत्ती, विषयावर शिकवण्याची हातोटी. शिकवणीबद्दल सरांचा जबाब नाही. गणित शिकवताना इतक्या तन्मयतेने शिकवायचे की आम्ही विद्यार्थी अक्षरश: असा विचार करायचो की त्यांच्या पाया पडायला पाहिजे. विद्यार्थांच्या मनात सन्मानाचा भाव, आदर्शवाद असे त्यांचे वर्तन होते.
कामाशी काम आणि बाकी केवळ साधेपणा. विषयाच्या शिकवणीबरोबर शिस्तपणा पण शिकवायचे. जीवनात शिस्तीने वागायचं असे ते नेहमी म्हणायचे. मला अस वाटतं की एखादी थप्पड जर लगावली असती तर ती मला जीवनात योग्य असती.
पाटील सरांच्या चेहऱ्यावर केवळ करुणा व कृतज्ञताच होती, अभिमान दिसलाच नाही. सरांच्याबद्दल प्रेम व आदराची भावना जोपासून ठेवली आहे. त्याची नुस्ती आठवणी माझ्या मनाला बाल्य देणाऱ्या आणि व्यथित करणाऱ्या सारखं होत.
सरांच्या जीवनाचा साधेपणा आणि करुणामय गरिबी. त्यांनी जे संस्कार त्यांच्या वागण्यातून आम्हाला दिले याचा माझ्या जीवनात फार मोठा स्थान आहे. ते आठवले की खरच कसेसे वाटते. मनावर कोरले गेले ते पाटील सरच! सरांच्या गेल्याची बातमी जेव्हा मला एका वर्गमित्रामार्फत कळली तेव्हा ‘हो का!’ असे म्हणून मी विचारांच्या नादात निघून गेलो. मला फार फार वाईट वाटले. त्यांच्या मुलाबरोबरच त्यांना अग्नी देण्याचे पुण्य मलाही मिळाले असते तर?
गुरू हा सुखाचा सागरू। गुरू हा प्रेमाचा आगरू।
गुरू हा धैर्यांचा डोंगरू। कदाकाळीं डळमळीना।
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
नमुना कृती.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.
वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.